मुंबई बाजार समितीच्या चटई क्षेत्र प्रकरणी न्यायालयात शपथपत्र दाखल करणार – मंत्री अब्दुल सत्तार

नागपूर, दि. २1 : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबई येथील विकास टप्पा दोन मार्केट एक या मार्केटमधील चटई क्षेत्र वाटप प्रकरणी आठ दिवसात उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले जाईलअशी माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत दिली.

सदस्य महेश शिंदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. श्री. सत्तार पुढे म्हणाले कीमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४६६ गाळेधारकांना एफएसआयचे वाटप केले आहे. अशा या गाळेधारकांकडून फरकाची रक्कम वसूल करण्याची सर्वांना नोटीस पाठविण्यात आलेली आहे.  या प्रकरणी न्यायालयात आठ दिवसाच्या आत विभागाकडून शपथपत्र दाखल केले जाईल आणि न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच संपूर्ण चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी सीनियर कौन्सिल नेमून सर्व  माहिती न्यायालयाला दिली जाईल. या प्रकरणी अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाईलअसेही मंत्री श्री. सत्तार यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button